२ मुलाचा बाप असताना सुध्दा गोविंदा 90 च्या दशकात ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीच्या होता प्रेमात, तिच्या ‘बर्थडे’ला चक्क ट्रक भरून पाठवले होते ‘फुलं’

मुंबई : वृत्त संस्था – प्रसिध्द अभिनेता गोविंदाने त्याच्या डान्स व अभिनयाच्या जोरावर 90च्या दशकात मोठ्या प्रमाणात चाहत्यांच्या मनात जागा करुन बसला होता. त्यावेळी गोविंदाच्या अभिनयाची जसी चर्चा होत होती तसीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची सुध्दा होत होती. ती म्हणजे गोविंदा आणि राणी मुखर्जीच्या प्रेमकहानीची. हि कहानी आहे 90 च्या दशकातील शेवटच्या काळातील जेव्हा मनोज अग्रवाल यांनी एक सिनेमा करण्यास सुरुवात केली होती.

‘हद कर दि आप ने’ या चित्रपटामध्ये गोविंदा आणि राणी मुखर्जी या दोघांना रोल दिला गेला होता. त्यावेळी गोविंदा मोठे स्टार होते. दरम्यान हद कर दि आप ने च्या चित्रीकरणाच्या वेळी राणी आणि गोविंदा यांच्या मधिल जवळीकता कमालीची वाढली व बघता-बघता राणी-गोविंदा एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हा या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा होण्यास सुरूवात झाली.

राणी-गोविंदाचे प्रेम प्रकरण सुरू झाले तेव्हा गोविंदाचे लग्न झालेले होते व त्याला दोन मुलेही होते. पण प्रेम तर झाले होते. तेव्हा गोविंदा त्याचा जास्तीत जास्त वेळ हा राणी बरोबर घालवायला लागला. ज्यावेळी राणीचा वाढदिवस होता तेव्हा चक्क गोविंदाने तिच्या वरसोवाच्या फ्लॉट वर 1 ट्रक भरून फुले पाठवली होती. गोविंदाच्या या अशा वागणुकीचा परिणाम अर्थातच त्याच्या कुटूंबावर झाला. वेगवेगळ्या चर्चा होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे गोविंदावर कुटूंबाचा दबाव, सामाजिक दबाव वाढत गेला. त्यामुळे राणी व गोविंदाच्या करियरवर याचा परिणाम होत गेला. हे प्रकरण तब्बल चार वर्षे चालले.

राणीच्या कुटुंबाला हे नातं मान्यं नव्हतं. एका नात्यासाठी दुसरे खूप सारे नाते तुटत चालले होते. दरम्यान राणीच्या आयुष्यात दुसऱ्या अभिनेत्याचे आगमन झाले. तेव्हा राणीने स्वत:ला गोविंदापासून दुर ठेवण्यात जास्त फायदेशीर समजले व आपल्या करियरवर लक्ष देण्यास तिने योग्यता मानली व गोविंदासोबत असलेले 4 वर्षाचे नाते तोडून टाकले.

राणीने जरी आपला नविन रस्ता स्विकारला असला तरी या प्रकरणाचा गोविंदाच्या करियरवर चांगलाच असर पडला. पुढे मात्र वेगळेच झाले. गोविंदा आणि राणी आपल्या नात्याचे स्पष्टिकरण देत राहिले की, आमच्यात असे काहीही नव्हते. मात्र त्यांच्या प्रेमाची चर्चा मिडियावर खूप होत गेली.