‘माझा नाही झाला तर कोणाचा कशाला होऊ देवू…’प्रियकरा’ला संपवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशात 29 सप्टेंबर रोजी झालेल्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. या हत्याप्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली असून या हत्येमागील कारण अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता.

हत्या करून त्याचा मृतदेह फेकुन देण्यात आला होता. मृत तरुणाचे नाव बंटी उर्फ अफजल अली असे असून अनैतिक सांबंधातून त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत युवक हा पंजाबमधील भटिंडाचा रहिवासी असून या युवकाचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. राजरानी हि त्याच्या सोबत राहू इच्छित होती, मात्र काही वर्षांपूर्वी अफझलने लग्न केले. यामुळे तिने त्याचा काटा काढायचे ठरवले.

दारूमध्ये गोळ्या टाकून केली हत्या
यावेळी तिने  भेटण्याच्या बहाण्याने उत्तरप्रदेशच्या सीकरीमध्ये बोलावले. त्यावेळी तिने त्याला दारूमध्ये गोळ्या टाकून बेशुद्ध केले आणि गळा कापून त्याची हत्या केली. त्यानंतर चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडाने त्याचा चेहरा ठेचला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात राजरानी, इकबाल आणि इसरार या तिघांना अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com