वाहतूक नियमांचे उल्लंघन, २७९ जणांचे पासपोर्ट रोखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बेशिस्त वाहन चालवल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त वाहन चालकांना वाहतुक नियमांचे पालन करण्यास वाहतुक पोलिसांकडून अनेक वेळा सांगण्यात आले. त्यांना शिस्त लागावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. मात्र बेशिस्त वाहन चालकांवर याचा काही परिणाम होताना दिसत नसल्याने वाहतुक शाखेने वाहतुक नियमांचे उल्लंखन घरणाऱ्यांचे पासपोर्ट रोखले आहेत. तर काही जणांचे वाहन परवाने जप्त केले आहेत. वाहतुक शाखेने १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने जप्त केले आहेत तर २७९ वाहनचालकांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज आले असताना ते रोखले आहेत.
[amazon_link asins=’B01FXJI1OY,B07DFL5NML’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a70263a-ba97-11e8-984e-efc6591a240c’]

शहराच्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे़ त्याला काही बेशिस्त वाहनचालक कारणीभूत आहेत. हे लक्षात घेऊन वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सुरवात केली. त्यानुसार १ जानेवारी ते ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यास सुरवात केली. वाहतूक शाखेने १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने जप्त केले आहेत. त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाहनचालकांची संख्या १ हजार ५०३ इतकी आहे. इतर जिल्ह्यातील ३३८ जणांचा समावेश आहे. यामध्ये मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे़ त्या खालोखाल भाडे नाकारणाऱ्यांची संख्या आहे.

पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी २७९ जणांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले असून त्यांपैकी बहुतेकांवर किमान १ गुन्हा दाखल आहे़ काही जणांवर २ किंवा ३ गुन्हे आहेत़, त्यांचे पासपोर्ट अर्ज पडताळणी रोखून धरली आहे. अशांवर आणखी काही गुन्हे आहेत का याची पडताळणी करुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा स्पष्ट उल्लेख करुन हे अर्ज पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालय त्यांचे अर्ज फेटाळूही शकतात, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
[amazon_link asins=’B00UWM5JJI,B01MSYQWNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16cd20ca-ba97-11e8-b361-79e4845a100c’]

नो एंट्रीमधून वाहन चालकांविरुद्ध वाहतुक पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली. दरम्यान, सोमवारी दत्तवाडी वाहतुक शाखेने रॉग साईउने येणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर अवघ्या चार तासांमध्येच संबंधीत वाहनचालकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. २७९ या कलमान्वये दाखल गुन्ह्यातील हे दत्तवाडी वाहतुक पोलिसांनी पहिले दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले़ व न्यायालयाने आरोपीला दंड केला आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी