नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबच्या पटियालामध्ये एका घटस्फोट घेतलेल्या व्यक्तीशी एका महिलेने विवाह तर केला परंतु 15 दिवसांनंतर वाद घालून ती माहेरी परत गेली. सासरच्यांनी अनेकदा हेलपाटे मारुन 1 लाख रुपये देऊन समज घातली परंतु पत्नी परत सासरी परतली नाही. परंतु त्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, त्याने ज्या तरुणीशी विवाह केला आहे तिचा हा 5 वा विवाह आहे.
जगदीप सिंह यांने मनप्रीत कौरशी विवाह केला होता. जगदीप सिंह याने पहिला विवाहनंतर घटस्फोट घेतला होता आणि त्याला एक मुलं देखील आहे. जगदीप सिंहच्या एका नातेवाईकाने मनप्रीतशी त्याचा दुसरा विवाह लावून दिला. मनप्रीतने देखील ती घटस्फोटीत असल्याचे सांगितले होते आणि तिला दोन मुलं देखील आहे.
विवाहाच्या 15 दिवसानंतर नवविवाहित पत्नी भांडण झाल्याने मोहालीमध्ये माहेरी निघून गेली. त्यामुळे पती पत्नीला घेऊन येण्यासाठी मोहाली येथे हेलपाटे घालत होता, त्याने 1 लाख रुपये देखील पत्नीच्या घरच्यांना दिले. परंतु पत्नी घरी परत आली नाही. असे 3 महिने चालत राहिले आणि एक दिवस सत्य समोर आले.
मनप्रीतने पहिल्यांदाच चार वेळा लग्न केले होते आणि जगदीप सिंह यांच्याबरोबर लग्न केले होते. जोपर्यंत जगदीप सिंह त्याच्या पत्नीच्या घरच्यांना मनवण्यात यशस्वी झाला, तो पर्यंत पत्नीने 6 वे लग्न केले होते. आपल्याबरोबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जगदीप सिंह यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर फसवणूक करणाऱ्या 29 वर्षीत मनप्रीत कौर, तिचा भाऊ काला सिंह, आई बलजीत कौर आणि वडील बीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. परंतु अजूनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले नाही.
जगदीप सिंह यांच्या मते, पत्नी 20 हजार रुपये रोख रक्कम आणि कपडे आपल्याबरोबर घेऊन गेली होती. यापूर्वी मनप्रीतने 4 विवाह झाल्याची कबुली दिली होती.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –