वरासोबत घेतले फेरे, नंतर लग्नाच्या रात्रीच प्रियकरासोबत फरार झाली वधू

लखनऊ : वृत्त संस्था – उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये एक अशी घटना घडली आहे, जी ऐकून सर्वजण हैराण होत आहे. लग्नात सात फेरे घेतल्यानंतर वधू आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आणि रात्रभर याची खबरही कुणाला लागली नाही. जेव्हा सकाळी हा प्रकार उघड झाला तेव्हा खळबळ उडाली.

हे प्रकरण गोंडाच्या छपिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे गावातील एका व्यक्तीकडे 26 नोव्हेंबरच्या रात्री गोंडाच्याच मनकापुर येथून वरात आली होती. अंगणात वाजत-गाजत वर्‍हाडी मंडळी वरासोबत दाखल झाले आणि मंगलकार्य सुरू झाले. यानंतर सात फेर्‍यांचा विधीसुद्धा पूर्ण झाला. मात्र, कुणालाच माहित नव्हते, पुढे काय होणार आहे.

जेव्हा सर्व विधी पूर्ण झाले आणि सर्व आराम करू लागले तेव्हा हिच संधी साधून सकाळी नववधू आपल्या प्रियकरासह घरातून फरार झाली. सकाळी जेव्हा वधु सापडत नसल्याचे वधुच्या कुटुंबियांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला. अगोदर त्यांनी कुणालाच न सांगता शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ती सापडली नाही.

हळुहळु बातमी सर्वत्र पसरली की, वधू फरार झाली. सर्वत्र शांतता पसरली. कुणाला काहीच समजत नव्हते, की आता काय करायचे. यानंतर दोन्ही कडील लोकांनी आपसात चर्चा केली की पुढे काय करावे.

यानंतर गाववाल्यांच्या सहकार्याने दोन्ही पक्षांमध्ये निर्णय झाला की, कुणीही काहीही कारवाई करणार नाही आणि तक्रार नोंदवणार नाही. वधुच्या घरच्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे, ते लोक रडत सुद्धा आहेत. याबाबत छपिया पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.