‘चारमीनार माझ्या बापाने बनवली, तुझ्या नाही’, अकबरूद्दीन ओवैसींचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्याने चर्चात आले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हैदराबादमध्ये बोलताना अकबरुद्दील ओवैसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की जेव्हा लोक कागदपत्र तपासणीसाठी घरी येतील तेव्हा त्यांना सांगा की आम्ही या देशात 800 वर्ष राज्य केले आहे. ही चारमीनार माझ्या वडीलांनी बनवली आहे, तुझ्या बापाने नाही.

हैदराबादमध्ये बोलताना अकबरुद्दीन म्हणाले की कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. ते काय बोलत आहेत ते मान्य करण्याची देखील आपल्याला गरज नाही. मुसलमानांकडे काय आहे असे लोक विचारतात, त्यांनी माझे सांगणे आहे की तु माझे कागदपत्र तपासू इच्छितो, मी 800 वर्षापर्यंत या देशात राज्य केले आहे, शौर्य गाजवले आङे, हा देश माझा होता, आहे आणि राहिलं. माझे वडील आणि माझ्या आजोबांनी या देशाला चारमीनार दिला, कुतुबमीनार दिला, जामा मशीद दिली. या देशाला पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात, तो लाल किला देखील आमच्याच पूर्वजांनी दिला आहे.

जर कुणी तुमच्याकडे कागदपत्रं मागत असेल तर त्याला स्पष्ट सांगा की, तू आमच्याकडे कागदपत्रं का मागत आहेस… तो जो चारमीनार आहे.. तो माझ्या पूर्वजांनी बनवला आहे. तुमझ्या बापाने नाही, असे अकबरुद्दीन म्हणाले. अकबरुद्दीन ओवैसी यांनी याआधी देखील असे वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –