मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली असून कंपनीने 4G सेवा लाँच केली आहे. कर्नाटक आणि केरळनंतर आता आंध्र प्रदेशमध्ये कंपनीने 4G सेवा लाँच केली आहे. त्यामुळे आता या राज्यातील लोकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. बीएसएनएलचे आंध्र प्रदेशातील विभागीय मुख्य मॅनेजर ए. पी. राव यांनी आज यासंदर्भातील घोषणा केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, दिवसेंदिवस आमचे ग्राहक वाढत असून आम्ही देखील ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आंध्रप्रदेशात साडेतीनशे 4G टॉवर्स उभारण्यात उभारण्यात येणार आहे. यासाठी कंपनी जवळपास २०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना मोठया प्रमाणात फायदा होत असून मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वपर वाढल्याची माहिती देखील राव यांनी दिली.
दरम्यान, कंपनीने या निर्णयानंतर आणखी १५० टॉवर्स उभारण्याची योजना आखली असून जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत एकूण १७ हजार ब्रॉडबँड कनेक्शन दिले असल्याची माहिती देखील बीएसएनएलच्या वतीने देण्यात आली आहे.
- ‘या’ ८ कारणांमुळे किडनी होते खराब, तुमच्या ‘या’ चूकीच्या सवयींना वेळीच आवरा
- सुवर्णप्राशन म्हणजे काय ? काय आहेत याचे मोलाचे ‘फायदे’ ?
- दातांमध्ये वेदना का होतात ? कारणांसह जाणून घ्या ८ ‘खास’ उपाय
- आयुर्वेदात सांगितलेले दुध पिण्याचे नियम माहित आहेत का ? जाणून घ्या
- तुमच्या घरातच आहेत ‘या’ गोष्टी, ज्यामुळे तुम्हाला होऊ शकतो कॅन्सरसारखा आजार
- रक्त शुद्ध करण्याच्या ‘या’ नैसर्गिक १४ उपायांनी शरीर राहील नेहमी निरोगी
- प्राचीन काळापासून आहेत ‘ही’ रामबाण औषधे, जाणून घ्या २९ उपाय
- ताकात मध मिसळून पिल्याने होतात हे फायदे, मधाचे ७ उपाय
- वजन वाढवायचे असेल तर आहारात करा ‘या’ ५ गोष्टींचा समावेश ; जाणून घ्या