CAB : सर्वांना माहितीय कोण-कोणाला ‘भडकवतंय’, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) विरोधात राजधानी दिल्लीसह देशात बर्याच ठिकाणी निदर्शने होत आहेत. या कायद्यामुळे विरोधी पक्षदेखील सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या निषेध करणार्या विद्यार्थ्यांविरूद्ध दिल्ली पोलिसांच्या कथित कारवाईचे प्रकरण सुप्रीम कोर्टासमवेत दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या प्रकरणावर कडक शब्दात टीका केली आहे. ‘कोण कोणाला भडकावतो हे सर्वांनाच ठाऊक आहे’, असे त्यांनी म्हंटले आहे.
लोकशाहीची मुळे कमकुवत आहेत :
CAB विधेयकावर झालेल्या निषेधावर भाष्य करताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, लोकशाहीमध्ये एकमत व मतभेद या नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, जेव्हा त्यादरम्यान हिंसा आणि गोंधळ उडतो तेव्हा ते लोकशाहीची मुळे कमकुवत करतात. नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाच्या हिताचा असून मानवी आदर देण्याची ही बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी संयम ठेवला पाहिजे :
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही हिंसक निषेध रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांना प्रोत्साहन दिले आहे. ते म्हणाले की, जेव्हा पोलिस अशांतता रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा त्यांनी त्यात संयम दाखवावा. तसेच, जे चिथावणी देणारे आहेत, ते देशाचे नुकसान करीत आहेत. हे कोणाला भडकवत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, असेदेखील नक्वी यावेळी म्हणाले. तसेच आंदोलकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून शांतता राखण्याचे आवाहनदेखील मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- वीकेंडला झोप पूर्ण करून घ्या, अन्यथा पडू शकते महागात, वाचा ‘हे’ ३ निष्कर्ष
- रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !
- कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या
- ‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती