‘सरकार’च्या मंत्रिमंडळाचा ‘विस्तार’ होणार पण ‘तात्पुरता’, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितलं
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या सभागृहात आज (रविवार) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी टोलेबाजी, शेरेबाजी आणि फटकेबाजी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याला आर्थिक मदत मिळविण्यासाठी ते आगामी काळात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र तो तात्पुरता विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा अध्यक्ष म्हणून आज नाना पटोले यांनी बिनविरोध निवड झाली तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, मागील सरकारच्या काळातील विकास कामांची माहिती मागवली असून त्यावर किती खर्च झाला, किती कामे शिल्लक आहेत आणि कुठे कामे होत आहेत. कामे का अडली आहेत, किती प्रमाणात प्रगती झाली आहे. तात्काळ करण्याजोगी कामे कोणती आणि कमी महत्वाची कामे कोणती, याचा लेखाजोखा मी मागविला असल्याचे त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ठाकरे सरकार हे फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिकाच काढणार असल्याचं अप्रत्यक्षरित्या दिसत आहे. आगामी काळात होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार देखील तात्पुरता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Visit : Policenama.com
- विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे
- ‘डेंग्यू’च्या रुग्णांना ‘या’ ५ गोष्टींच्या सेवनाने मिळेल आराम, जाणून घ्या
- हृदयविकार आणि ‘कार्डिअॅक अॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे
- महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे
- ‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या
- रोज अंडे खाण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, जाणून घ्या
- महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे