केंद्रीय कर्मचारी व शेतकर्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट ; जाणून घ्या मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने शेतकरी व केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत खात्याला आधारशी जोडण्याची मुदतवाढ देण्यात आली तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.
जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चार महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल –
1) केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भात्यात 5% वाढ –
केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता बुधवारी 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचार्यांना आणि त्या व्यतिरिक्त 65 लाख पेन्शनधारकांना होईल. अशा प्रकारे महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढून तो 17% झाला आहे. जुलै 2019 पासून हे लागू होईल. यामुळे कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि यासाठी 16 हजार कोटी रुपये खर्च येईल.
2) विस्थापित काश्मिरी कुटुंबांनामिळतील 5.5 लाख –
काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर भारतातील अनेक राज्यात स्थायिक झालेल्या 5300 काश्मिरी कुटुंबांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता या कुटुंबांना केंद्राकडून 5.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल जेणेकरून ते काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकतील. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पीओकेच्या विस्थापितांना नुकसान भरपाई जाहीर करताना सांगितले की यामुळे ऐतिहासिक चुक सुधारण्याची संधी मिळेल. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरसाठी मंत्रिमंडळाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पीओकेकडून विस्थापित झालेल्या 5300 कुटुंबांना ज्यांनी देशाच्या इतर भागात स्थलांतर केले आणि ते आता जम्मू काश्मीरला परतत आहे त्यांना 5.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. विस्थापित कुटुंबांसोबत झालेली चूक सुधारण्यासाठी हे एक पाऊल आहे.
Cabinet approves Inclusion of 5,300 DP families of Jammu & Kashmir-1947 who initially opted to move outside the State of Jammu & Kashmir but later on returned and settled in the State of Jammu & Kashmir.#CabinetDecisions
Details here: https://t.co/R3cr8qdmrB
— PIB India (@PIB_India) October 9, 2019
3) खात्यास आधारशी जोडण्याची मुदत वाढवली –
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रुपयांचा वार्षिक लाभ घेण्यासाठी खात्याला आधारशी जोडण्याची मुदत सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. प्रकाश जावडेकर म्हणालेकी , मंत्रिमंडळाने 1 ऑगस्ट, 2019 नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत निधी जाहीर करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत खात्यास आधार जोडणे आवश्यक आहे. रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान-किसान योजनेंतर्गत 7 कोटी शेतकर्यांना आधीच फायदा झाला आहे. त्याअंतर्गत तीन समान हप्त्यावर शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
#Cabinet approves MoUs signed between India and Foreign Broadcasters in the field of Radio and Television.
Details here: https://t.co/hPQNauMY8a#CabinetDecisions
— PIB India (@PIB_India) October 9, 2019
4) रेडिओ आणि टेलिव्हिजन क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारक यांच्यामधील करारास मान्यता –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेडिओ व टेलिव्हिजन क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारकांच्या दरम्यानच्या करारास मान्यता दिली आहे. परदेशी प्रसारकांशी झालेल्या करारामुळे सार्वजनिक प्रसारकाला नवीन दृष्टिकोन, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन धोरणांच्या संदर्भात कठोर स्पर्धेच्या मागण्या, न्यूज मीडियाचे उदारीकरण आणि जागतिकीकरण पूर्ण करण्यास मदत होईल.
परस्पर विनिमय, सह-निर्मितीद्वारे निर्मित कार्यक्रमांचे प्रसारण दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरील प्रेक्षक / श्रोता यांच्यात समतेचे आणि समाकलनाचे वातावरण निर्माण करेल. तांत्रिक माहिती, तज्ञांची देवाणघेवाण आणि कामगारांचे प्रशिक्षण हे प्रसारण क्षेत्रात उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी सार्वजनिक प्रसारकांना मदत करेल.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर