नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारने आता एक नवे पाऊल उचलले आहे. आता देशातील ६५ शहरांमध्ये ५,६४५ इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी काल इलेक्ट्रिक वाहनांवरील आंतर मंत्रालयीन समितीने याबाबत निर्णयाला मंजुरी दिल्याचे ट्विटरद्वारे स्पष्ट केले.
मेक इन इंडिया ला मिळणार गती
यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या बसेस पूर्णतः मेड इन इंडिया असणार आहेत. त्यामुळे यांचे उत्पादन भारतातच होणार असून निवडक शहरांना आणि राज्य परिवहन मंडळांना या बसेस सबसिडीच्या दराने पुरवल्या जातील. त्यामुळे याद्वारे मेक इन इंडिया मोहिमेला देखील बळ मिळणार असून भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये वाढ करण्याचा सरकारचा हेतू देखील साध्य होईल. या ५,६४५ इलेक्ट्रिक बसेस एकूण ८ राज्यांच्या परिवहन मंडळांमध्ये वितरित केल्या जाणार आहेत.
The inter-ministerial committee for EV Vehicles today sanctioned 5645 electric buses for intracity operations in 65 cities and for intercity operations to 8 state transport undertakings. This will give huge impetus to automobile sector, clean up our cities & drive Make in India.
— Amitabh Kant (@amitabhk87) July 29, 2019
ई-वाहनांच्या वापरासाठी सरकारचे प्रोत्साहन
मागील आठवड्यात वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेने ई-वाहनांवरील कर १२ टक्क्यांहून ५ टक्के केला आहे. ही कपात १ ऑगस्ट पासून लागू होईल. याचबरोबर २०१९-२० च्या बजेटमध्ये देखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावर १.५ लाख रुपयांपर्यंत आयकरात सूट देण्याचा प्रस्ताव होता.
याआधीदेखील नीती आयोगाने १५० सीसी पर्यंतच्या दुचाकींना ३१ मार्च २०२५ पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सामितीने भारतात ३१ मार्च २०२३ पर्यंत देशातील सर्व तीन चाकी वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये परिवर्तित करण्याचा देखील सल्ला दिला आहे. देशातील प्रदूषणाच्या समस्येवर आणि तेलाच्या वाढत्या किमतीच्या समस्येवर हा रामबाण उपाय असल्याचे बोलले जात आहे.
- जेवणानंतर थोडासा गुळ खा, होतात ‘हे’ ५ मोठे फायदे, जाणून घ्या
- थंड वातावरणात काही दिवस ‘या’ १४ पदार्थांपैकी काही एक खाल्ल्यास शरीराला मिळेल बळ
- जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा
- योग्य प्रमाणात चहा घेतल्याचे ‘हे’ २० उपयोग जाणून घ्या, यामुळे प्रत्येकाला आवडेल हे पेय
- ‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा
- थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी, सुंदर राहण्यासाठी ‘हे’ ६ उपाय, जाणून घ्या
- स्वच्छतेच्या अभावी ‘आमांश’ हा जीवघेणा आजार होते, जाणून घ्या ५ कारणे आणि उपाय
- आवळा खाण्याचे ‘हे’ ५ सोपे प्रकार, दूर होतील विविध आजार
- थंड वातावरणातही घाम येतो का ? ‘या’ ८ घरगुती उपायांनी दूर करा ही समस्या
- जाणून घ्या, ‘या’ ६ आजारात काय खावे आणि काय खाऊ नये, असे पाळा पथ्य