वैवाहिक बलात्कारासंदर्भात SC चा सवाल, म्हणाले – ‘पती कितीही क्रूर असला तरी त्या शरीरसंबंधांना…’

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला दिलासा देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देत असताना या व्यक्तीला आठ आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. दरम्यान न्यायालयाने यावेळी वैवाहिक बलात्कार म्हणजे विवाह झाल्यानंतर बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्याच्या तक्रारींसंदर्भातही उपस्थित केले आहेत. जर एखादं जोडपं पती पत्नी म्हणून एकमेकांसोबत पाहत असेल तर पती कितीही क्रूर असला तरी त्या दोघांमधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का?,” असा प्रश्न सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. वी. राजसुब्रमण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने उपस्थित केला आहे.

विविध प्रकरणांसंदर्भात निकाल देताना खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवलं आहे. दाखल केलेल्या याचिकांपैकी एक याचिका आरोपीचीही आहे. २०१९ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला या आरोपीने आव्हान दिल आहे. उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर जिल्ह्यामध्ये आरोपीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची नोंद रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळू लावली होती.

हि सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. त्यावेळी तक्रारदार महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलाने आरोपीने तक्रारदार महिलेची सहमती मिळवत २०१४ मध्ये हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील एका मंदिरामध्ये घेऊन गेला आणि त्यांनी तिथे लग्नाचा विधी केल्याचा दावा केला.

विविहाचे खोटं आश्वासन देणं चुकीचं आहे. केवळ पुरुषच नाही तर कोणत्याही महिलेनेही
लग्नाचं अशाप्रकारचं आश्वासन देऊन नंतर शब्द फिरवता कामा नये, असं मत खंडपीठाने नोंदवलं. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्त मखीजा यांनी आरोपी आणि महिला दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यानंतर या महिलेने लग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.तक्रारीत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याचिकार्त्याचे वकील मखीजा यांनी त्रास देण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. तर ही तक्रार दाखल करणाऱ्या महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी या व्यक्तीने महिलेचा पती असल्याचे नाटक केले त्यानंतर दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर आरोपीने महिलेला मारहाण केली असून दोघांमधील शरीरसंबंधांसंदर्भातील वैद्यकीय पुरावेही न्यायालयासमोर दाखल करण्यात आले. मात्र पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या या दोघांमधील संबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.