सावधान ! ‘कोरोना’च्या भीतीमुळं करत असाल रेल्वेचं तिकीट ‘रद्द’ तर तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं ‘रिकामं’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रकोपामुळे रेल्वेदेखील सतर्क झाली आहे. लोक प्रवास करणे टाळत आहेत. ज्यामुळे हजारोच्या संख्येने रेल्वे तिकिट रद्द केले जात आहेत. तुम्ही सुद्धा काही कारणामुळे रेल्वे तिकिट रद्द करत असाल तर सावध व्हा. अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसात सायबर फ्रॉडच्या प्रकरणात वाढ झाली आहे. तिकिट रद्द करण्याच्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे.
आयआरसीटीसीने ई-मेल पाठवून प्रवाशांना सावध केले
तिकिट रद्द करण्यासाठी प्रवाशांकडून बँक डिटेल्स घेऊन सायबर गुन्हेगार लोकांना फसवत आहेत. रेल्वेने आपल्या प्रवाशांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही कारणासाठी रेल्वे तुमच्याकडून तुमच्या बँक खात्याची कोणतीही माहिती मागत नाही. जर तुम्ही कुणाला ही माहिती दिलीत तर तुमची फसवणूक होऊ शकते.
कुणालाही महिती देऊ नका
ईमेलमध्ये रेल्वेने म्हटले आहे की, प्रवाशांनी आपला अकाऊंट नंबर, एटीएम कार्ड, पिन, टीपीन, सीव्हीव्ही आणि युपीआय डिटेल्ससह अन्य माहिती कुणालाही देऊ नये. सायबर गुन्हेगार ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील रक्कम पळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. आम्ही कोणालाही फोन कॉल किंवा एसएमएसद्वारे व्यक्तिगत माहिती मागत नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.
अशी घ्या खबरदारी
1. ई-तिकिट कॅन्सलेशननंतर रिफन्ड प्रोसेस पूर्णपणे ऑटोमेटिक असते. रिफन्डची रक्कमसुद्धा आपोआप खात्यात टाकली जाते, ज्या खात्यातून रेल्वे तिकिट बूक केले गेले त्या खात्यात ही रक्कम टाकली जाते.
2. तुमचे तिकिट रद्द करण्याची कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेयर करू नका.
3. आयआरसीटीसीसंबंधी कोणतीही माहिती गुगल किंवा अन्य ठिकाणी सर्च करताना सावधानी बाळगा. रेल्वे तिकिट बुकिंग, रिफन्ड किंवा अन्य प्रश्नांची उत्तरे यूजर्सला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळतील.
4. तिकटी रद्द करण्याशिवाय आयआरसीटीसीची अन्य सेवांसाठी सुद्धा रिफन्ड प्रोसेस ऑटोमेटिक होते. यामध्ये