मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काळजीवाहू सरकार फक्त वर्षावर आहे. बांधून ठेवलेल्या सामानावर बसून त्यांना उलटसुलट कारवाया करता येणार नाहीत. पाच वर्षे या भयंकर स्थितीतून महाराष्ट्र गेला आहे. जनतेच्या मनाप्रमाणेच घडावे. बा विठ्ठला, आता चुक होणार नाही. चंद्रकांतदादांनी पांडुरंगासमोर लोटांगण घातलेच आहे. निदान त्यांना तरी सुबुद्धी द्या, अशा शब्दात सामना मधून आज टिका करण्यात आली आहे.
गेल्या १५ दिवसात एकीकडून संजय राऊत तर दुसरीकडून सुधीर मुनगंटीवार व इतर नेते एकमेकांवर टिकाटिपण्णी करत होते. शुक्रवारी प्रथमच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रिंगणात उतरत एकमेकांवर तोंडसुख घेऊ लागले.
सामान्यातील अग्रलेखात म्हटले आहे की, काय चुकले, काय पाप केले ते सारा महाराष्ट्रच पाहतो आहे. पाप फार झाले म्हणून आधी कोरडा आणि नंतर ओल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. काय चुकले ते आपल्या मनास विचारा इतकेच पांडुरंगाचे म्हणणे असावे. राज्यात आजही सत्ता स्थापनेचा घोळ संपलेला नाही. आणि त्याचे खापर एकमेकांवर फोडण्याचे खेळ सुरु आहेत.
गेल्या सात वर्षांत अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्या प्रत्येकवेळी भाजपने तात्काळ सत्तास्थापनेचा दावा केला. गोवा आणि मणिपुरात तर सर्वात मोठ्या पक्षांना डावलून भाजपने राज्यपालांच्या सक्रिय सहकार्याने सत्तास्थापनेचा दावा केला हे उघड सत्य आहे, असे म्हणून सामना म्हणतो की, मात्र, महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असूनही ते सत्तास्थापनेचा दावा करीत नाहीत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबरला संपुष्टात आली.
या काळात कोणतेही सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भय दाखवले जात आहे. यात काहीही तथ्य नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन पर्यायी व्यवस्था होईलपर्यंत राज्यपालांनी त्यांनी ‘काळजीवाहू’ मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
शिवसेनेशिवाय आम्ही राज्य स्थापन करु शकत नाही, असे त्यांचे नेते राज्यपालांना भेटून आल्यावर सांगतात. हे त्यांचे प्रेम उतू चालले आहे. सत्यप्रकाशाचा उजेड त्यांच्या जीवनात पडला आहे. की नवे ‘पेच’ गोड बोलून टाकले जात आहेत? असा प्रश्न सामन्याच्य अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. बा विठ्ठला त्यांना सुबुद्धी दे अशी विनवणी केली आहे.
Visit : Policenama.com
- आपणही घटवू शकता अदनान सामी सारखे वजन, जाणून घ्या पद्धत
- 200 किलो वजन असलेल्या गणेश आचार्यने असा कमी केला लठ्ठपणा
- अनंत अंबानीचे वजन होते तब्बल 208 किलो ! असे केले कमी
- ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ निर्माण करण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ खास उपाय
- एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढविण्यासाठी ‘हा’ उपाय करा, जाणून घ्या
- प्रथमच जीममध्ये जाताय ? ‘या’ 5 गोष्टींचा करू नका संकोच, जाणून घ्या कोणत्या
- हाडांच्या आरोग्यासाठी फुटबॉल खेळ उपयुक्त ! शक्य असल्यास आवश्य खेळा
वेळीच लक्षणांवरून ओळखा मानसिक ताणतणाव, अशी घ्या काळजी