नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हैदराबाद बलात्कार प्रकरणी देशात असंतोषाचे वातावरण होते आणि त्या प्रकरणातील आरोपींचे एन्काऊंटर करून त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या एन्काऊंटरमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला असून अनेक क्षेत्रातील जेष्ठ लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. अनेक खासदारांनी लोकसभेत आपापली मतं मांडली आहेत.
Arvind Sawant,Shiv Sena, in Lok Sabha:A law needs to be constituted through which such(crimes against women) cases are heard directly in Supreme Court,currently procedure starts from lower courts,process goes on&on.I appeal to you(Speaker)to set up a committee to discuss this pic.twitter.com/RTsgvnakNI
— ANI (@ANI) December 6, 2019
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपले मत मांडले आहे. त्यात ते म्हटले की, “हैदराबाद सारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टातच सुनावणी व्हावी” अशी मागणी त्यांनी केली. लोकसभेत बोलताना खासदार सावंत म्हणाले, “महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचे खटले हे थेट सुप्रीम कोर्टात चालवले जावेत यासाठी कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याची कायदेशीर प्रक्रिया ही खूपच संथ असून कनिष्ठ न्यायालयापासून सुरु होऊन ती पुढे सुरुच राहते. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्यास उशीर होतो. असे त्यांनी आपले स्पष्ट मत मांडत लोकसभा अध्यक्षांना आवाहन केले की, असे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात चालवण्याबाबत चर्चेसाठी एक समिती नेमावी.” अशा प्रकारे अरविंद सावंत यांनी लोकसभेत आपले मत स्पष्ट केले.
- नियमित खजूर खाल्ल्याने होतात ‘हे’ ११ आरोग्य फायदे, जाणून घ्या
- तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट
- नियमित खा शेंगदाणे, होतील ‘हे’ आरोग्यदायी १० फायदे, जाणून घ्या
- तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या
- सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय
- ‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे
- संत्र्यापेक्षा सरस आहे शिमला मिरची ! ‘हे’ आहेत ७ आश्यर्चकारक फायदे