दररोज काजू खाल्याने ‘हे’ आजार येतात नियंत्रणात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे नियमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही. तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काजूचे काही खास उपाय आणि फायदे सांगणार आहोत. ते वाचल्यानंतर तुम्ही रोज नक्की काजू खायला सुरुवात करताल.

१) काजू हा उर्जेचा उत्तम स्रोत मानला जातो. काजू खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकतो. अनेकवेळा व्यक्तीला काही कष्ट न करता थकवा जाणवतो. अशावेळी २-३ काजू खाल्ले तर तुमचा मूड चांगला राहील आणि थकवा ही दूर होईल.

२) काजूमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते. विविध आजारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषधं घेण्यापेक्षा काजूचे सेवन केले तर तुमचे अनेक आजार बरे होण्यास मदत होईल.

३) तुम्ही जर काजू दररोज खाल्ले तर हाडे मजबूत होतात. काजूमुळे दात आणि हिरड्याही सशक्त राहतात. तसेच ह्दयविकारावरही काजूही रामबाण औषध आहे. काजूमध्ये एंटी ऑक्सिडेंट असल्याने शरीराचे वजन संतुलित ठेवले जाते.

४) काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळेल. काजू तेलकट, शुष्क प्रत्येक प्रकरच्या त्वचेसाठी लाभदायक आहे.

५) तुमची त्वचा तेलकट असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किवा दही थोड्या प्रमाणात मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

आरोग्यविषयक वृत्त –