नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSC) बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय आज (मंगळवारी) घेण्यात आला आहे.
CBSE Board Class XII examinations cancelled pic.twitter.com/8qnwV14JH6
— ANI (@ANI) June 1, 2021
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला १२ वी च्या परीक्षांबाबत २ दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. दरम्यान, १२ वीची परीक्षा रद्द केल्याचे आता सुप्रीम कोर्टाला ३ जूनला कळविण्यात येणार आहे.
लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या
2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती
सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत