ईद साधेपणाने साजरी करण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे API दिलीप पवार व इकबाल शेख याचे आव्हान

वालचंदनगर : वृत्त संस्था  – कोरोना मुळे देशात धुमाकूळ घातलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेला पवित्र रमजान ईद हा सर्वात महत्त्वाचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, याकरिता वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व अल्पसंख्याचे अध्यक्ष इकबाल शेख यांनी आव्हान केले आहे ईद हा आनंद साजरा करण्याचा सण असला तरी लॉकडाऊन मुळे देशाचे झालेल्या आर्थिक ,नुकसान , बहुतांश कष्टकरी समाज बांधवांना त्यांचा बसलेला फटका यामुळे संवेदना म्हणून सर्वांनीच यावर्षी ची ईद कोणताही डामडौल न करता नवीन कपडे सौंदर्य प्रधाने खरेदी न करता अत्यंत साधेपणाने साजरी करावी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी इतरांना मदत करावी, त्यातून लॉकडाऊन च्या सर्व नियमाचे पालन करणेे कोरोना चा मुकाबला करण्यासाठी आपले महत्त्वाचे योगदान असावे याकरिता समाजामधून प्रयत्न होत आहेत.

मुस्लिम धर्मातील महत्त्वाच्या सणा पैकी ईद उल फितर म्हणजेच रमजान ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते, सामुदायिक कर्त्या प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. यातील फीतर या शब्दाचां अर्थ दान करणे असा आहे, रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते, ईदला नवीन वस्त्र प्रदान करून मुस्लिम बांधव जागेवर किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात ईदचा उत्सव अवर्णनीय असतो, कुटुंबातील लहानपणापासून थोर पर्यंत सगळे आनंदात सहभागी होतात, ईद साठी घर सुशोभित केले जाते, शिरखुबा , मिठाई खाऊ घालण्यासाठी. मित्र_नातेवाईकांना आमंत्रण करतात, सामुदायिक मेजवानी होते, मात्र कोरोना निमित्ताने सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन मध्ये या सर्व गोष्टीचा परिणाम बदललेला आहे, गेली दोन महिने बंद असलेल्या शहरातील दुकान हळूहळू उघडत आहेत , बाजार मध्ये गर्दी वाढत चाललेली आहे.

कोरोणाचा वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अजून एकही रुग्ण आढळला नसला तरी धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे सावधान गिरीची सर्वांनच गरज आहे, सण म्हणून आपण या धोक्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा त्रास सर्वांनाच होणार आहे, त्यामुळे कोरोना प्रतिबंदाला गालबोट लागेल, अशी कोणतीही गोष्ट होता कामा नये यासाठी पोलिस प्रशासन व कार्यकर्ते लक्षवेधक आहेत, त्यातच गेले दोन महिने सुरू असलेल्या लाॅकडाऊनचा सर्वांनाच थोडाफार आर्थिक फटका बसला आहे, समाजात बहुतांश लोक कष्टकरी वर्गातल्या आहेत दोन महिने त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ते सण साजरा करू शकणार नाहीत ईदच्या शुभ परवाला गरीब समाज बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद आनंदाची नाही , असे मानले जाते, समाजातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन परवाचा आनंद घेता यावा, यासाठी जगात व फितरची तरतूद आहे, त्यामुळे ही ईद नेहमीसारखी उत्सवी न करता समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देणारी ठरावी याकरिता वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष इकबाल शेख यांनी आव्हान केले आहे.