भारतीय जवानांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचे शहरात फटाके फोडून कौतूक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – भारताने एअर स्ट्राईक करुन पाकीस्तानातील अतिरेकी यांचे बंकर उध्दवस्त करुन 200 ते 300 अतिरेक्यांना ठार केले.या निमित्ताने साऱ्या भारतात हवाई दलातील जवानांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचे कौतूक केले जात आहे. प्रत्येक भारतीय नागरीकाला देशातील सैन्य दलातील जवानाचे कौतूक आहे.देशाचे रक्षण जवान सीमा भागात करतात म्हणूनच आपण सामान्य जिवन जगतो आहोत.अशी देशातील प्रत्येक नागरीकांचे मत आहे.

सैन्य दलातील जवानांचे कौतूक करण्यासाठी आज धुळ्यात गुरुशिष्य स्मारकाजवळ फटाके फोटून आनंद व्यक्त करताना भाजप जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल,हिरामण गवळी,विनोद मोराणकर,विजय पाच्छापूरकर,अनिल थोरात यशवंत येवलेकर व महिला कार्यकर्त्या हि उपस्थित होत्या युवा सेना वतीने,बजरंगदल,विश्वहिंदू परिषद वतीने बुंदी,पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.