तिसर्‍या लाटेची तयारी : केंद्र सरकारने म्हटले – ’मुले पसरवू शकतात कोरोना संसर्ग परंतु…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने शनिवारी म्हटले की, मुले कोविड-19 संसर्ग पसरवू शकतात. परंतु त्यांना जवळपास नेहमीच हलका संसर्ग होत असतो आणि त्यांच्यात मृत्यूदर सुद्धा अतिशय कमी असतो. हे वक्तव्य त्या शंकेदरम्यान आले आहे, जे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत व्यक्त केले जात आहे की, पुढील लाट मुलांसाठी अतिशय घातक ठरू शकते.

यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी म्हटले होते की, अशा कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य सुविधा सातत्याने चांगल्या केल्या जात आहेत.

तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, सकारात्मकता दर कमी होण्यासह देशात कोविड-19 महामारीची स्थिती सुद्धा नियंत्रणात येत आहे. यासोबतच दैनिक आणि सक्रिय प्रकरणांची संख्या सुद्धा कमी होत आहे. मंत्रालयाने सांगितले की, 10 मे रोजी सकारात्मकता दर 24.83 टक्के होता जो 22 मे रोजी 12.45 टक्के वर आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, सात राज्य अशी आहेत जिथे रोज 10 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत आणि सहा राज्यांमध्ये हा आकडा पाच ते दहाच्या दरम्यान आहे. सहा राज्यात कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडु, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्ली आहे.