‘केंद्र सरकार चुकीची पावलं उचलतंय, अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही’ : P चिदंबरम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चुकीची पावलं उचलत असल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. ते म्हणाले, की, या पावलांनी अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही. सरकरानं गांभीर्यानं असे उपाय शोधावेत ज्यामुळं लोकांच्या खिशात पैसे येतील व ते स्वच्छेने खर्च करू शकतील.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं न देता अचानक ती समाप्त झाल्याचं सांगितलं. चिदंबरम यांनी सीतारामण यांच्या या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करून आरोप केला की, राज्यांची स्वत:ची भूमिका असून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जायला हवी होती. जर सरकार ते टाळत असेल तर राज्य सरकारे त्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करेल.

सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न

चिदंबरम म्हणाले, ” राज्यांनी 12 टक्के जीएसटीवाल्या उत्पादनाला आपल्या पैशानं खरेदी का करावं ? ते स्वतंत्र आहेत. त्यांना हवं तिथे ते त्यांचे पैसे खर्च करतील. कर सवलतीच्या नावानं सरकार कर्मचाऱ्यांना ज्या उत्पादनांची गरज नाही ते विकत घेण्यासाठी भाग पाडत आहे.” चिदंबरम यांनी सरकारला 7 प्रश्न विचारले आहेत. सरकार अशी बंधनं कशी घालू शकतं ज्यात जीएसटीचं बिल असावं. ज्यावर 12 टक्के जीएसटी असावी, जीएसटी नोंदणीकृत दुकान असावं, डिजिटल पेमेंट व्हावं असं चिंदबरम म्हणाले.