राहुल गांधींना राजकीय अंगणवाडीत पाठवा, भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहा महिन्यात देशातील युवक पंतप्रधानांना काठ्या मारतील या राहुल गांधींच्या विधानामुळे भाजप नेते चांगलेच संतापलेले आहेत. यातच कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती हि पंतप्रधान नरेंद्र मोदींना काठ्या मारू शकत नाही. राहुल गांधींना राजकारणात कसे वागावे, कसे बोलावे याचे काहीही ज्ञान नसल्यामुळे त्यांना राजकीय शिक्षणासाठी बालवाडीत पाठवावे असा टोला  केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

बालवाडीत जाऊन ते राजकारणाची एबीसीडी शिकतील, बोलण्याचा शिष्टाचार सुद्धा शिकतील त्यामुळे त्यांना राजकारणात कसे बोलायचे वागायचे हेही कळेल .