शिवसेनेला आव्हान दिल तर गाडून टाकू : रामदास कदम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी लाट असतांना महाराष्ट्रात शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होत. आणि आता त्यांच काहीच नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात येऊन कोणीही शिवसेनेला आव्हान दिल तर आम्ही त्याला गाडून टाकू असा इशारा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिला.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात युती झाली तर ठीक नाहीतर विरोधीयोंको पटक देंगे असा इशारा दिला होता, दरम्यान अमित शहा यांच्या या इशाऱ्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मोदी लाट असतांना महाराष्ट्रात शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होत. आणि आता त्यांच काहीच नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात येऊन कोणीही शिवसेनेला आव्हान दिल तर आम्ही त्याला गाडून टाकू. असा इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे, अमित शहा यांनी ज्या सभे मध्ये शिवसेनेला इशारा दिला होता त्याच सभेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळाचा नारा दिला होता. इतकेच नव्हे तर लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवा असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.