Chamoli : महापुरात 2 जणांचे मृतदेह आढळले, 150 जण बेपत्ता असण्याची शक्यता

उत्तराखंड : वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. महापुरामध्ये धरण फुटले असून यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेले आहेत ते खालच्या बाजूला रहात असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 150-200 जण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

अनेक लोक दोन वीज प्रकल्पावर काम कर होते. जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्याने पाण्याचा वेगवान प्रवाहाने वाटेत आलेल्या दोन प्रकल्पांवर काम करत असलेले अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. दोन्ही वीज प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीज प्रकल्पावर काम करत असलेले 100-150 लोकांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. अचानक आलेल्या महापूरानंतर या लोकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, खबरदारी म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैणी गावातील वीज प्रकल्पावर झालेल्या हमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे.