पोलीसनामा ऑनलाईन : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने लोक त्रस्त झाले आहे. सध्या सुरु असलेल्या लग्नाच्या हंगामामुळे जोरदार हिमवृष्टी असूनही अनेक वर वरात घेऊन नववधूला घ्यायला आले. दरम्यान, चमोली जिल्ह्यातील दुर्गम घाटातील रामणी गावात असेच एक लग्न झाले. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा रेड अलर्टनंतरही वऱ्हाडी मंडळी वाजतगाजत वरात घेऊन जाताना दिसले. एवढेच नाही तर कडाक्याच्या थंडीतही वऱ्हाडींनी अनेक किलोमीटर पायी प्रवास केला.
हवामानखात्याच्या रेड अलर्टनंतर चामोली जिल्ह्यातील भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तरी, रामणी गावात लग्नाची मिरवणूक दिसली. प्रचंड हिमवृष्टीच्या दरम्यानही नवरदेवाने आपल्या वधूला घेण्यासाठी पायी वाजतगाजत वरात काढली. त्यामुळे ही वरात अविस्मरणीय बनली.
वऱ्हाडी पोहोचल्यानंतर बर्फवृष्टीतही गावकरी नाचताना दिसले. हिमवृष्टीने संपूर्ण लग्नाचे वातावरण बिघडवले असतानाच हिमवृष्टी झाल्यानंतरही लग्नाचे वातावरण खूपच आनंददायी दिसत होते. दरम्यान, लग्नासाठी पुढे शुभ मुहूर्त नसल्याचे बोलले जात आहे.
अतिवृष्टीमुळे मोठी समस्या :
सतत होणार्या हिमवृष्टीमुळे लोक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे, बर्फवृष्टीच्या दरम्यान, चामोली घाट विकासखंड येथील बंगाली आणि रामणी या गावात वऱ्हाडी मंडळींचा उत्साह दिसून येत आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून, गेल्या ३६ तासांपासून हिमवृष्टी आणि पाऊसामुळे गोंधळ उडाला आहे. या हिमवृष्टीमुळे सर्वात मोठी समस्या लग्न घरी आहे. कडाक्याची थंडी आणि बर्फात वऱ्हाडीमंडळींना बरेच किलोमीटर चालत जावे लागते.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- ‘वजन घटवताना अवेळी भूक लागते का? ‘या’ ४ पद्धतीने करा नियंत्रण
- वजनाचा तोल सांभाळण्यासाठी शिका कॅलरीचे गणित, ‘या’ १४ गोष्टी लक्षात ठेवा
- रक्तदाबाची सामान्य पातळी किती? सुमारे ५० टक्के लोक अनभिज्ञ
- हायपरटेन्शन आजाराची ‘ही’ आहेत ७ लक्षणे, आणि ४ गंभीर परिणाम
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती