CM ठाकरेंचे जनतेला आवाहन, म्हणाले – ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घ्या’ (Video)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात थैमान घातलेलली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी आता तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी केले आहे. पावसाळा येतोय या काळात सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावरील उपचारांबाबत आता औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे औषधांचा अनाठायी वापर आपण टाळायला हवा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन – LIVE https://t.co/LUqpUbu1ja
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray शनिवारी (दि. 29) मुंबईत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उदघटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना आजाराबाबत आता अधिक सतर्क राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. कोरोना हा आजार अजिबात अंगावर काढू नका. हा आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच उपचार घ्या अन डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतेही औषध घेऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच राज्यात आता कोरोनानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रसार वाढतो आहे. यामागे औषधांचा अतिवापर हे महत्वाचे कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असे व्हायला नको. बुरशीजन्य आजारांवर देखील आता उपचारपद्धती निश्चित व्हायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या
पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !
TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’
Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या