आज वर्षातील दुसरे ‘चंद्रग्रहण’, या ३ गोष्टी केल्यास ‘लाभ’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १६ जुलै म्हणजेच आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होत असून हे ग्रहण अनेक दृष्टींनी महत्वपूर्ण आहे. यावेळी अत्यंत दुर्लभ योग येत असून १४९ वर्षाआधी १२ जुलै १८७० रोजी पाहिल्या गुरुपोर्णिमेवर हा योग आला होता.
१६ आणि १७ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजून ३१ मिनिटांनी हे ग्रहण सुरु होऊन ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे. जवळपास २ तास ५९ मिनिटांपर्यंत हे ग्रहण चालणार आहे. या ग्रहणाचे सुतक १६ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजून ३१ मुनीटानी सुरुवात होणार आहे. नागरिक ग्रहणांना फक्त वाईट अर्थानेच पाहतात मात्र जर तुम्ही योग्य उपाय केले तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.
या तीन उपायांमुळे होऊ शकतो लाभ
१) जर घरात दीर्घ काळापासून कुणी आजारी असेल तर ग्रहणानंतर तूप आणि खिरीचे सेवन केल्याने तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ऊं चंद्राय नम: चा जप केल्याने देखील फायदा होऊ शकतो.
२) ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही प्राणायाम आणि व्यायाम करायला हवेत. त्याचबरोबर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. ग्रहण संपल्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे.
३) अंघोळ झाल्यानंतर देवाच्या मूर्त्यांना देखील स्नान घालावे आणि त्यांची पूजा करावी. त्याचप्रमाणे गरजुंना अन्नदान आणि ब्राह्मणांना देखील अन्नदान केल्याने फायदा होतो.
भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी
गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका
जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे
‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती
‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या
मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी