Chandrakant Patil | ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं’, चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्याची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. शिवसेनेच्या बंडखोर नेते (Shiv Sena Rebel Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदी (CM) विराजमान केल्याने आपल्याला दु:ख झाल्याचं त्यांनी स्वत: मान्य केलं. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळे आपल्याला शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यास मान्य करावं लागल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या मेळाव्यात सांगितले. मेळाव्यातील हा व्हिडीओ भाजपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (BJP Social Media Platform) होता. मात्र पाटलांच्या या वक्तव्यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं याची गंभीर दखल घेत त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे.

 

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पनवेलमध्ये पहिल्यांदाच भाजप कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) उपस्थित होते.

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय नेतृत्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दु:ख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात वसंतराव नाईक (Vasant Rao Naik) यांच्यानंतर सलग पाच वर्षे राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपणे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. पण केंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिला आणि तो फडणवीस यांनीही मानला. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत. त्यामुळे आता चला आपल्या घरी. कामाला लागू आणि जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत.

 

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
कुठल्याही सरकारचे एकच मुख्यंमत्री असतात. मुख्यमंत्री हेच नेते असतात. त्यामुळे आपले नेते एकनाथ शिंदे आहेत.
ते मी याकरता सांगतोय, मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी एवढंच सांगितलं, आपल्याला हे माहिती नव्हतं. आपल्याला वाटलं आपलंच सरकार येणार आहे.
आपल्याला आपलाच मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे.
अचानक हा निर्णय आल्यामुळे धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कुणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा आपलं वेगळं मत आहे.
असं अजिबात नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळे एकत्रित होतो. आता हे चालत असतं.
माध्यमांचं काम असतं. ते त्यांचे काम करत असतात. आता शिवसेना (Shivsena) आणि भाजपचं सरकार (BJP Government) आहे.
हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच त्यासोबत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp seniors leaders take chandrakant patil statement seriously on eknath shinde become chief minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…