चंद्रकांत पाटलांनी केले शरद पवारांचे ‘कौतुक’, अजित पवारांना ‘टोला’

पोलिसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारला शरद पवार मार्गदर्शन करीत नसल्याचे दिसत नाही. त्यांचा कामाचा स्पीड भयंकर आहे, कदाचित मुलं-मुलं करत आहेत तर करू द्या अशी त्यांची भूमिका असावी. मुख्यमंत्री हे तास दोन तासांचा कोकण करून येतात, याउलट पवार हे दोन दिवस कोकणात मुक्काम करतात. पवार या वयात दौर्‍यावर जात असतील तर मग राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार हे मंत्री कोकणात का जात नाहीत? असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आघाडी सरकारला लगावला.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई ही हेक्टरी नाही तर प्रतिफळ झाड मिळावी, कारण हे कोकणातील फळबागांचे नुकसान पुढच्या पाच ते पंधरावर्षांसाठीचं असणार हे, अशी मागणी पाटील यांनी केली. भाजपतर्फे आज कोकणातील आंजर्ले गावासाठी पत्रे, कौलं आणि धान्याची मदत पाठवण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ’कोकणातील चक्रीवादळ नुकसानाबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांशी बोललो असून राज्याने केंद्राकडूनही मदत मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहे, कारण राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे, असेही ते म्हणाले. ’सरकार कोरोनाच्या बाबतीत गोंधळलेले आहे, मुळात हे सरकारचे लेचंपेचं हे, कोणी निर्णय करायचे कसे निर्णय करायचे ? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळेच प्रशासकीय पातळीवर गोंधळ दिसत आहेस अशी टीकाही पाटील यांनी केली.