चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध दारुविक्री आणि महसूल नुकसानामुळे महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याच्या तयारीत आहे. दारुबंदीमुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याने आघाडी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच वर्षापूर्वी भाजप सरकारने दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भाजप सरकार सत्तेमध्ये असेपर्यंत हा निर्णय कायम राहिला. मात्र, भाजप सत्तेतून गेल्यानंतर आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर याआधीच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक लावण्यात आला. भाजप सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा घेतलेला निर्णय आता ठाकरे सरकार हटवण्याच्या तयारीत आहे.
दारुबंदीमुळे मागील पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. बेकायदा विक्रीमुळे महसूल बुडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूलवाढीसाठी ठाकरे सरकार दारूबंदी हटवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे