मोबाईलप्रमाणेच आता वीजपुरवठ्याचाही करावा लागणार रिचार्ज ! ‘या’ तारखेपासून नियम लागू
पुढील 3 वर्षात स्मार्ट प्रीपेड मीटरनेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. मोबाईलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असणार आहे. केंद्र सरकारनं 2022 पर्यंतची यासाठी मुदत दिली आहे. या स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये शिल्लक रक्कम असेल तोपर्यंतच वीज वापरता येणार आहे. ती संपताच वीज पुरवठा बंद केला जाईल आणि कार्ड रिचार्ज केले तरच वीज पुरवठा सुरु होईल. मागेल त्याला वीज या योजनेखाली वर्षभरात 2.26 कोटी नव्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नव्या ग्राहकांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या या संख्येनुसार बिले पाठवणे आणि बिल वसूल करण वीज कंपन्यांना अवघड होत आहे. बिले विलंबाने गेल्याने वसुलीही वेळेत करता येत नाही. यातून वीज कंपन्यांना तोटाही होत आहे. बऱ्याचदा चुकीचे बील आले असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीही समोर येतात. वीजेची चोरीही मोठ्या प्रमाणात होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ही वीजचोरी रोखणे शक्य होणार आहे.
अविरत विजेचा पुरवठा
येत्या 1 एप्रिल किंवा त्याआधीही सर्व ग्राहकांना अविरत वीज पुरविणे कंपन्यांना सक्तीचे होईल. मध्यंतरी राज्यांनी मागेल त्याला वीज पुरविण्याचे सामंजस्य करार केंद्राशी केले होते. त्याचाच हा भाग आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीत संबंधित राज्याचा वीज नियामक आयोग वीज कंपनीस यात सवलत देऊ शकेल.
स्मार्ट प्रीपेड मीटरचे हे असणार फायदे-
1) स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे आता वीजचोरीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
स्मार्ट प्रीपेड मीटरचे तोटे-
1) स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये पैसे शिल्लक असेपर्यंत तुम्हाला वीजेचा वापर करता येणार आहे. त्यामुळे तुमचा रिचार्ज संपला तर तात्काळ तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. पूर्वी तुमचे बिल थकले तरी तुम्हाला काही दिवसांची मुदत असायची लागलीच तुमचा वीज पुरवठा खंडित होत नव्हता. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.