[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2cc34260-bcfa-11e8-a7ce-0786335bd4af’]
औषधांची ऑनलाइन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुण पिढीचं कधीच भरुन न येणारे नुकसान होऊ शकतं, असं एआयओसीडीने म्हटलं आहे.
केंद्र सरकार, संबंधित मंत्री आणि विभाग, राज्य अन्न व औषध प्रशासन यांना निवेदन पत्रिकांच्या माध्यमातून वारंवार आवाहन केलं होतं आणि ई-फार्मसीज, पोर्टल्स किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीच्या अनेक केसेस दाखवल्या होत्या, असं एआयओसीडीचे म्हणणे आहे.
या समस्येच्या गांभीर्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्ट्सनी दोन वेळा एक दिवसीय बंद केला आणि आठ तास काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रयत्नांनंतरही ऑनलाईन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन करत असताना अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याचं दिसत आहे, असाही दावा एआयओसीडीने केला आहे.
पुणे : समलिंगी तरुणांमधील वादात कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न