‘लॉकडाऊन’वरून चेतन भगतचा मोदी सरकारला ‘टोला’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे देशात लॉकडाउनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून (18 मे) लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे. मात्रा, तरीही देशातील विविध भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे लॉकडाउन हा श्रीमंतांचा खेळ आहे. श्रीमंत व्यक्ती जर आजारी पडला तो सुट्टी घेऊन महिनाभर घरी बसू शकतो. मात्र गरीबांकडे हा पर्याय नाही. श्रीमंत देश बराच काळ लॉकडाउन घोषित करु शकतात. मात्र गरीब देशाकडे तो पर्याय नाही,असे ट्विट करीत प्रसिद्ध लेखक चेतन भगतने सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

सोशल मीडियावर चेतन भगतच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. चेतन भगत बर्‍याच वेळा समाजात घडणार्‍या घटनांवर व्यक्त होत असतो. सध्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु असून उद्यापासून (18 मे) लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. लॉकडाउन चारमध्ये निर्बंध शिथील करण्याबरोबरच आर्थिक घडामोडींना जास्तीत जास्त चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उत्पादन कारखाने सुरु करण्याबरोबरच देशांतर्गत मर्यादित मार्गावर हवाई सेवा सुरु होऊ शकते, असे बोलले जात आहे. मात्र त्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्रा, तत्पुर्वी भगतने केलेल्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण आले आहे.