‘इंदिरा के जमाने का, पाकिस्तान का सन्नाटा चाहिये’ : छगन भुजबळ 

नांदेड  : पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित मनी लाँड्रींगच्या आरोपाखाली अडीच वर्षे तरुंगात काढून परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी  महाआघाडीच्या प्रचारसभेत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी  20 फेब्रुवारी रोजी महाआघाडीच्या पहिल्याच प्रचार सभेत छगन भुजबळ यांनी ‘हमे सिर्फ इंदिरा के जमानेका, पाकिस्तान का सन्नाटा चाहिये’ असे उद्गार काढले. व भाजपाचे नेतृत्व देशाचे भले करू शकत नाही असा हल्लाबोल केला. त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ द्या असे आवाहन केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच वक्त्यांनी सरकारवर टीका केली. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्यावर अन्याय केल्याचे सांगताना, माझ्यावर कोणता गुन्हा दाखल केला आहे याची कल्पना अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनाही नव्हती, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ज्या दिवशी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी प्रियंका गांधी यांनी आपली पत्रकार परिषद रद्द करून या हल्ल्याविषयीची संवेदना व्यक्त केल्याचेही ते म्हणाले आहेत.