पी. चिदंबरम यांनी चक्क ‘तिहार’ तुरूंगातून दिला ‘महाविकास’ आघाडीला ‘हा’ महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाविकासआघाडी राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने कूच करत आहे. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. परंतू या दरम्यान महाविकासआघाडीला काँग्रेसच्या बड्या नेत्यांना तुरुंगातून सल्ला दिला आहे. आयएनएक्स मिडिया प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राजकीय घडमोडींवर महाविकासआघाडीला महत्वाचा सल्ला दिला.

यावेळी महाविकासआघाडीला सल्ला देत त्यांनी भाजपवर कठोर शब्दात टीका केली. तुरुगांत असताना देखील त्यांनी आपले अनेक विचार ट्विटरच्या माध्यामातून मांडले. त्यांच्या कुटूंबियांच्या माध्यमातून त्यांनी हे ट्विट केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिंदमबरम यांनी ट्विटमध्ये म्हणाले की महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्याकरिता सह्यांसाठी पहाटे 4 वाजता राष्ट्रपती कार्यालयाला पाचारण करण्यात आले हा या कार्यालयावरील एक प्रकारचा हल्लाच होता. यासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत वाट का पाहण्यात आली नाही ? असा सवालही त्यांनी विचारला.

उद्धव ठाकरेंना चिंदमबरम यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. परंतू त्यांनी या दरम्यान महाविकास आघाडीला सल्ला देखील दिला. कृपया तुम्ही प्रत्येकाच्या पक्ष हिताला सरकारमध्ये दुय्यम स्थान देत शेतकरी कल्याण, गुंतवणूक, रोजगार, सामाजिक न्याय आणि महिला व बालकल्याण या प्राधान्यक्रमाच्या तिन्ही पक्षांच्या समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रितपणे काम करा.

चिंदमबरम ट्विटमध्ये म्हणाले की संसदीय लोकशाहीच्या उत्क्रांतीचे निरीक्षण करणारे लोक अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या, विविधांगी, अनेकवचनी समाजासाठी काम करणाऱ्या राजकीय आघाड्या स्विकारतात. कारण अशा आघाड्यांमधून राजकीय पक्ष तडजोड करण्यास शिकतात तसेच किमान सामान कार्यक्रमावर सहमत देखील होतात.

Visit : Policenama.com