राज्यात आघाडीचाच मुख्यमंत्री, युवकांना संधी : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस सोडून गेलेल्यांची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या जाण्यामुळे उलट नवीन युवकांना पक्षसंघटनेत काम करण्याची संधी मिळेल. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना केला.
थोरात म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करणार करण्याचा विचार आहे. त्यासाठी मनसे व वंचित आघाडीसोबत चर्चा करणार आहे. काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अशा वेळी नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देत पक्षाने समतोल साधला आहे. सर्वांना एकत्र घेवून सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. कठीण काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली त्यांना ही खऱ्या अर्थाने संधी आहे.
शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, सर्वत्र महागाई वाढली आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्या, बेरोजगारांना रोजगार नाही. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच भाजप, शिवसेना सरकार पाच वर्ष अपयशी ठरले आहे. याचा फायदा मिळून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच
‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही
दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्की टाळा
वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही
मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं
कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा
स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या
विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात
गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्त, जाणून घ्या