मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (शनिवार) विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची ही मोठी घोषणा मानली जात आहे. 2 लाखापर्यंतच कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
"गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांचे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, ते सर्व थकीत कर्ज २ लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे."
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/k39GD0ZeWt— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 21, 2019
मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा कोर्याचं काय म्हणून पुन्हा प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर फडणवीस यांनी त्याचा निषेध नोंदवला आणि त्यांनी सभात्याग केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील सर्व कानाकोपर्यातील शेतकर्यांच्या पीककर्ज माफीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- दातदुखी दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा होतो फायदा ! ‘हे’ आहे ६ फायदे
- तुम्हाला ‘रेड टी’ माहित आहे का? ‘हे’ आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ ७ घरगुती टिप्स !
- आठवड्यातून ५ वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो ‘हा’ फायदा
- छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येते का? ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- ‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
- भुकेमुळे राग येत असेल तर करा ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या