मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कोरोनाचे रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राचा कोरोनाचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर आला आहे. लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर व हातांची स्वच्छता अशी "मां कसम" सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन त्यांनी केले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 18, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठी अफेरेसिस युनिटचे दूरदृष्य प्रणालीच्या सहाय्याने उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी अशी व्यवस्था झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला, असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे. त्याचबरोबर कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना लस प्राप्त होईपर्यंत मास्कच ही उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता अशी मां कसम सर्वांनी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे. याच, पद्धतीने आगामी काळात जनजागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपाप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता या बाबत प्रत्येकापर्यंत जनजागृती करा, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.