मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज (मंगळवार) रात्री 8 वाजता जनतेला संबोधित करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज (मंगळवार) रात्री आठ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यापुर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेला संबोधित केले आहे. सध्या देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन 5.0 सुरू आहे. आता पावसाळा सुरू झाला. निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं तयारी केली आहे. एनडीआरएफच्या 9 टीम देखील राज्यात तैनात करण्यात आलेल्या आहेत.


कोरोनाच्या संकटादरम्यानच निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेशी संवाद साधतील.