Corona Virus : चीनच्या जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसचा भारतावर ‘इम्पॅक्ट’, लवकरच दैनंदिन जीवनातील ‘या’ वस्तू महागणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसचा परिणाम जगभरातील उद्योगधंद्यांवर होताना दिसत आहे. एकीकडे कच्चे तेल स्वस्त झाल्याने देशांतर्गत बाजारात पेट्रोल – डिझेलच्या किंमती घटल्या आहेत. तर दुसरीकडे रोज आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तु महागल्या आहेत. एका वृत्तानुसार चीनकडून भारत जे धान्य खरेदी करतो त्यात राजमाचा (घेवडा) प्रमुख समावेश आहे. देशात लागणाऱ्या एकूण राजमा पैकी भारत 50 टक्के राजमा चीनमधून आयात करतो. भारतीय कंपन्या औषध बनवण्यासाठीचा कच्चा माल चीनमधून खरेदी करतात. अशात आता पुरवठा थांबल्याने याचा परिणाम औषधांच्या किंमतीवर देखील होताना दिसत आहे.
भारतात महाग होऊ शकतात या वस्तू –
1. खाण्या पिण्याचा पदार्थांवर होणार परिणाम –
एका वृत्तानुसार, चीनच्या डलियन बंदरावरुन शिप येत नसल्याने जगभरात राजमाचे दर 8 टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या किंमती 1100 डॉलर प्रति क्विंटलवर पोहचले आहेत. तर दुसरीकडे चीनमध्ये सध्या उद्योगधंदे बंद करण्यात आले आहे. भारतात येणारे 300 कंटेनर बंदरावर अडकले आहेत. देशांतर्गत बाजारात कमतरता आल्यास एक महिन्यात या किंमती वाढू शकतात.
2. महाग होऊ शकतात औषध –
वीएम पोर्टफोलियोचे रिसर्च हेड विवेक मित्तलने यांनी सांगितले की औषध मिळवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल चीनमधून पुरवला जातो. त्यामुळे आता कंपन्यांना इतर देशात महागात कच्चा माल आणावा लागेल. यामुळे मधुमेह आणि रक्तदाबासारख्या उपचारांवर वापरण्यात येणारी औषधे महाग होऊ शकतात. चीनच्या वुहानमध्ये औषधांसंबंधित अनेक कंपन्या आहेत. भारतासारखे मोठे देश चीनमधून हा कच्चा माल घेतात. भारत 80 टक्के एपीआय चीनमधून मागवते. चीनमधून भारत 57 प्रकारचे मॉलिक्यूल्स मागवतात. कोरोनामुळे अनेक फॅक्टरीवर कुलूप लावण्यात आली आहेत.
भारताने उचलली पावलं –
देशातील औषधांच्या किंमती वाढून नये यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीत तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञ सहभागी असतील. या समितीने मोदी सरकारला जो रिपोर्ट सोपावला आहे, त्यानुसार एका महिन्यात चीनमधून औषधांचा पुरवठा न झाल्यास देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
3. एसी – फ्रिज आणि टीव्ही होऊ शकतात महाग –
त्यांचे म्हणणे आहे की ग्राहकांना आवश्यक असलेले एसी, फ्रिज त्यांचे पार्ट चीनमधून आयात होतात. तसेच चीनचे वुहान शहर ऑटो हब आहे. भारतातील ऑटो कंपन्याना आता देशातंर्गत ऑटो असेंलरी कंपन्यांकडून वस्तू खरेदी कराव्या लागतील. यामुळे या भारतीय कंपन्यांना मात्र फायदा होईल, परंतु ऑटो कंपन्यांमधील वस्तू बनवण्यासाठीचे दर वाढू शकतात.