धक्कादायक ! करवा चौथच्या दिवशी महिलेनं प्रियकरासोबत केलं ‘असं’, घरच्यांनी थेट ‘लव्हर’चा ‘जीव’च काढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करवा चौथच्या दिवशी एक महिला आणि तिच्या प्रियकराला महिलेच्या घरच्यांनी रंगेहाथ पकडले. दोघांनाही घरच्यांनी मार मार मारले अखेर दोघांनाही रुग्णालयात दाखल केले, तेव्हा समजले की त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अखिलेश मिश्रा असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक जयशंकर सिंह यांनी सांगितले की मिश्रा यांचा मृत्यू महिलेच्या घरच्यांनी मारहाण केल्यामुळे झाला आणि महिलेची स्थिती अत्यंत गंभीर आहे.

महिलेचे जुने प्रेमसंबंध
जयशंकर सिंह यांनी सांगितले की अखिलेश मिश्रा आणि महिलेचे जुने प्रेमसंबंध होते तसेच या आधी त्यांना विरोध केल्यामुळे महिलेच्या सासू सासऱ्यांना मारहाण करून गावातून काढून टाकले होते. तसेच मिश्रा यांच्यावर या आधी देखील अकरा वेगवेगळ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. जयशंकर सिंह यांनी सांगितले की अखिलेश मिश्रा यांच्या भावाच्या तक्रारीनंतर महिलेच्या फरार नातेवाईकांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या