चेन्नई : वृत्तसंस्था – सोमवारी (9 डिसेंबर) रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले . मात्र असे असले तरी या विधेयकाला अनेकांकडून विरोध केला जात आहे. मक्कल निधी मय्यम (एमएनएम)चे संस्थापक कमल हसन यांनी या विधेयकावर टीका केली आहे. भारताला केवळ एका समुदायाचा देश करण्याचा प्रयत्न हा मूर्खपणा आहे. असे प्रयत्न देशातील तरुणाई हाणून पाडेल. तुमच्या जुन्या संकल्पना लादायला हा काही प्राचीन भारत नाही. काही त्रुटी असल्यास घटनेत सुधारणा करण्यात वावगं नाही. पण त्रुटी नसतानाही घटनेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारचा विश्वासघात आहे असे कमल हसन म्हणाले आहेत.
Kamal Haasan, Makkal Needhi Maiam (MNM) on #CitizenshipAmmendmentBill2019: It's stupid to attempt to make India a country for one sect. Young India will reject such plans soon. It's not primitive India for your old plans. pic.twitter.com/zRTp5H7B2T
— ANI (@ANI) December 11, 2019
काही त्रुटी असल्यास घटनेत सुधारणा करण्याचे आपले कर्तव्य आहे, परंतु निर्दोष घटनेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे विश्वासघात आहे. केंद्राचा कायदा आणि हे विधेयक म्हणजे निरोगी व्यक्तीवर सर्जरी करण्यासारखा प्रकार असून, तो एक प्रकारचा गुन्हा आहे. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आणि ते अयशस्वी झाले. आता ते पुन्हा प्रयत्न करीत आहेत असेही कमल हसन म्हणाले आहेत.
Kamal Haasan, MNM: We have a duty to amend the Constitution if there was any error, but to attempt to amend a flawless Constitution is a betrayal. Centre's law and plan is akin to a crime of attempting surgery on a healthy person. Those who attempted and failed are trying again. https://t.co/WcfIcF4LVr
— ANI (@ANI) December 11, 2019
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 –
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.
सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. प्रस्तावित विधेयक ही अट शिथिल करून ती सहा वर्षांवर आणण्याची शिफारस करतं.
विरोधकांचा आक्षेप –
हे विधेयक मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या विधेयकाला कडाडून विरोध केला जात आहे.भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत.
फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !
युष्य लाभण्यासाठी नियमित खा ‘हे’ फळ ! जाणून घ्या ६ फायदे - मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या
- ‘सुपरफूड अॅवोकॅडो’! खाताना, खरेदी करताना, साठवताना ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- लठ्ठपणाच्या दुष्परिणामांचे ‘हे’ आहेत २ मुख्य प्रकार, जाणून घ्या
- तुम्ही लठ्ठ आहात का ? ‘या’ २ पद्धतीने ओळखा, नेहमी लक्षात ठेवा या ४ गोष्टी
- काविळ, दम्यावर कांदा गुणकारी ! ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे