नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही. तर शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील लोक का जात आहेत, यावर त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे, असा पलटवार फडणवीसांनी केला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
नेत्यांनी पक्षांतर करावे म्हणून ईडी सारख्या तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यावरही त्यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्या नेत्यांची ईडी चौकशी करत आहे, अशा लोकांना भारतीय जनता पक्षात कधीही घेतले जाणार नाही. जे चांगले आहेत, लोकांची कामे करतात अशांनाच पक्षात घेतले जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच कुणाला दबाव टाकून पक्षात घेण्याइतका आमच्याकडे वेळ नाही, असंही त्यांनी सांगितलं. भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास उत्सुक आहेत. भारतीय जनता पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी पक्षाची स्थिती नाही. आमच्याकडे मोदी यांच्यासारखा मोठा नेता आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हे सर्व सांगताना त्यांनी अजून एक गोष्ट नमुद केली. भाजप सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मदत केली आहे. अनेक साखर कारखानदारांना मदत केली आहे. त्यावेळी त्याबदल्यात पक्षात या असे कधीच म्हटलं नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
- व्यर्थ मानले जाणारे ‘हे’ रोप, स्त्री-पुरुषांच्या ‘या’ समस्यांवर रामबाण औषध
- महिलांच्या ‘मासिक’ चक्रासह कामेच्छाही ‘प्रभावित’ करतो ‘हा’ आजार, जाणून घ्या
- कॅन्सरपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, जाणून घ्या
- ‘कफ’, ‘पित्त’ आणि ‘वात’ का वाढतो ? कसे टाळावे, जाणून घ्या उपाय
- मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या
- डोकेदुखीमध्ये करू शकता ‘हे’ ७ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम
- ‘या’ धातूच्या भांड्यातील पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या
- पौष्टिक तत्त्वे वाढवण्यासाठी भाज्या खाण्याच्या ७ सोप्या पद्धती, जाणून घ्या
- शुध्द तुपाचा ‘असा’ वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे
- ‘या’ १० गोष्टींमुळे भंग होते एकाग्रता, जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी