CM Eknath Shinde | ‘लफंगे कोण आहे? लफंगेगिरी कोणी केली’, मुख्यमंत्र्यांचा मविआला जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत आज महाविकास आघाडी कडून महामोर्चा (MVA Mahamorcha) काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेत मविआच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल (Governor), भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला. यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला. चारोळीच्या स्टाईलमध्ये बोलताना ‘काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भाषणावर बोलताना शिंदे म्हणाले, तीच तीच भाषणं आपण पाहिली. आम्ही जे काम करतोय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुंबईत भगव्या झेंड्या पेक्षा इतर झेंडे दिसले. शिवसैनिक त्याचमुळे प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हे सरकार भक्कम सरकार आहे. ते डबल इंजिन सरकार आहे.
दोन लाख कोटी विकासासाठी दिलेले आहेत. कोणी म्हणाले एक महिन्यात हे सरकार पडेल आता पाच महिने झाले.
हे सरकार मजबूत आहे. लफंगे कोण आहे? लफंगेगिरी कोणी केली हे सर्वांना माहीत आहे.
खुर्ची मिळवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार सोडून कोणी काय केले हे सर्वांनी पाहिले आहे.
जे आपल्या हिंदू देवतांचा अपमान करतात ते देखील त्यांच्या व्यासपीठावर होते, हे आपले दुर्दैव असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde on maha vikas aghadi maha morcha at mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

Police Committed Suicide | खळबळजनक! नैराश्यातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Chandrakant Patil | शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, ‘फेसशिल्ड’ लावून केलं ‘पवनाथडी जत्रे’चं उद्घाटन