CM Eknath Shinde | मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? याचे विश्लेषण सामनातील ‘रोखठोक’ सदरातून करा; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

पैठण : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेला मराठी माणसाला (Marathi Manus) एवढा पुळका होता, तर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील मराठी माणूस बाहेर का फेकला गेला, या प्रश्नाचे उत्तर द्या. हिंमत असेल तर दैनिक ‘सामना’तून (Daily Samana) आजघडीला मुंबईत किती मराठी माणसं उरले, याची आकडेवारी जाहीर करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले आहे. मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांच्या पैठण येथील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, सामनातील रोखठोक सदरातून सातत्याने आमच्यावर टीका केली जाते. पण त्याच सदरातून मुंबईतील मराठी माणसाच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य करावं. तुमची सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस का बाहेर फेकला गेला? मराठी माणसाला वांगणी, बदलापूर, विरारला का जावे लागले, याचे विश्लेषण करा, असा सल्ला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Elections (BMC) प्रचाराचे रणशिंग फुंकले.

 

निवडणूक आली की मराठीचा मुद्दा
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत मुंबईतील मराठी माणसाच्या दुरावस्थेसाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना कशी जबाबदार आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना केवळ निवडणूक आली की मराठीचा मुद्दा पुढे आणते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा डाव असल्याचे सांगितले जाते.
पण हे सगळं केवळ निवडणुकीपुरतंच बोललं जातं. निवडणूक संपली की मराठी माणूस देशोधडीला का लागला,
मुंबईतील मराठी माणसांचा टक्का का कमी झाला, याकडे कोणीच लक्ष देत नाही. आता तुम्ही ज्या प्रकारे मुलुंड,
भांडूप, दादर आणि परळ भागातील घराघरांमध्ये जात आहात, तसे पूर्वी गेला असता
तर आज मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी झाला नसता. आधी मराठी माणसाचा वापर करायचा आणि
नंतर दुसऱ्यावर खापर फोडायचे ही रणनिती आमच्या लक्षात आल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

याच साबणाने तुमची धुलाई केली
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एकनाथ शिंदे यांची सेना लाचार असल्याचे म्हटले जातं.
एकनाथ शिंदे हे हा केवळ बुडबुडा आणणारा साबण आहे, असे म्हटले जाते.
या टीकेला एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले याच साबणाने तुमची धुलाई केली आहे, हे लक्षात असू द्या.
त्यामुळे शिवसेना या टीकेला कसे उत्तर देते हे पहावे लागेल.

 

Web Title :- CM Eknath Shinde | why marathi manus numbers reduced in mumbai cm eknath shinde asks shivsena cheif uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वानवडी येथील पनीर कारखान्यावर FDA चा छापा,800 किलो बनावट पनीर जप्त

 

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

 

Collector Dr. Rajesh Deshmukh | अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख