आज दुपारी दीड वाजता CM उध्दव ठाकरे जनतेला संबोधित करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज (रविवार) दुपारी दीड वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधतील. सध्या लॉकडाऊन 4.0 चालू असून तो 31 मे रोजी संपणार आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोन आणि रेड झोन सोडून इतर ठिकाणी लॉकडाऊन मध्ये काही प्रमणात सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आज दुपारी दीड वाजता नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तसेच मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे.