पालघरमधील घटना खूपच लज्जास्पद ! दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या अपवेमुळे पालघरमध्ये दोन साधू आणि एका चालकाला ठार मारण्यात आले आहे. ही घटना खूपच लज्जास्पद असून दोषींवर कारवाई होणारच अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावात लोकांना तीन साधूंना ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

हल्ला करणार्‍या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून याप्रकरणी माहिती दिली. या घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती. पालघरमधील घटना ही अतिशय गंभीर आणि अमानवीय आहे.

देश एका गंभीर परिस्थितीला सामोरा जात असताना तर हा प्रकार आणखी व्यथित करणारा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, ही मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली होती. पोलिसांच्या समोर जमाव लोकांना ठेचून मारतो, पोलिसांच्या हातातील साहित्य हिसकावून घेऊन त्यांना मारले जाते ही सर्वात मोठी लाजीरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येची
राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील 101 जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचे विवाद करुन सामाजिक तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे.असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.