‘जे कोण ‘थिल्लर-चिल्लर’ आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही’, CM ठाकरेंचा फडणवीसांवर ‘निशाणा’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याला अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी करत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीका केली होती. राज्य चालवायला हिंमत लागते. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करू नये असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील याला उत्तर देत निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कात्री येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती व नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,अशी ग्वाही त्यांना दिली. pic.twitter.com/62yisx3F0Q
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 21, 2020
जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. सध्या सीए ठाकरे हे अतिवृष्ठी झालेल्या शेतीच्या नुकसानीची पहाणी करत आहेत. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्याशी संवाद साधला. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. नुकसान मोठं आहे. मी इथं दौरा करत आहे आणि तिकडं मदत कशी आणि कधी करावी यासंदर्भात कामही सुरू झालं आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळं नुसता विचार नाही तर प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पहातो आहोत” असंही ठाकरेंनी सांगितलं.
आज मी तुळजापूर आणि या परिसराची धावती भेट घेतली. शेतकरी संकटात आहे, अनेकांची घरे-दारे वाहून गेली आहेत. अतिवृष्टी होत असताना थोड्या थोड्या वेळाने माहिती शासनाकडे येत असते. प्रशासनाला मी नेहमी हेच सांगतो, संकटे आल्यानंतर जीवितहानी होऊ देऊ नका, जीवितहानी कमीतकमी होईल याकडे लक्ष द्या. pic.twitter.com/QchRSB3qqK
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 21, 2020
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. परंतु राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये . सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल तर मग राज्य सरकार कशासाठी आहे. त्यांचं काम काय असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले आहेत. अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी पावसाच्या पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढला.