‘या’ दोन नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर या दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी ही दाखल केलेल्या नाहीत. जो पर्यंत दानवे, खोतकर एकमेकांवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करत नाहीत तो पर्यंत या दोघांना निवडणूक लढवायला बंदी घालावी. अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे दोघेही भ्रष्टाचारी आहेत. हे दोघे फक्त एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. मात्र, ते सिद्ध करत नाहीत. जो पर्य़ंत ते आरोप सिद्ध करत नाहीत तो पर्यंत त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

खोतकर आणि दानवे या दोघांनीही एकमेकांवर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पण कोठेही एकमेकांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या तक्रारी केल्याचं निदर्शनास आलेले नाही. या दोघांना आणखी निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास दोघंही भामटेपणा करून आणखी भ्रष्टाचार करतील. त्यामुळे हे नेते एकमेकांचा भ्रष्टाचार सिद्ध करत नाही. तोपर्यंत दोघांवरही निवडणूक लढवायला बंदी घाला, अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे केली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही तक्रार करण्यात आली असून निवडणूक आयोगाला देखील या तक्रारीचा मेल करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे केलेल्या या तक्रारीमुळे जालना शहरात एकच चर्चा सुरु आहे.

ह्याहि बातम्या वाचा

?सुरेश प्रभुंना उमेदवारी द्या अन्यथा शिवसेनेचा प्रचार करणार नाही

?सुजय विखेंचं खासदारकीचं तिकीट मुख्यमंत्र्यांकडून ‘कन्फर्म’

?देश तुमचा आहे, सरकारला प्रश्न विचारायला शिका

?पार्थ अजित पवारांच्या उमेदवारीने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत

?काँग्रेसला आणखी एक खिंडार