E-Pass बाबत ‘संभ्रम’ आणि ‘गोंधळ’ ! पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच; आज येणार अधिक स्पष्टता – पोलीस
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आजपासून अनलॉक सुरु होत आहे. शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्ही दर आणि ऑक्सिजन बेड वापराचे प्रमाण यावर त्यांची पाच गटात विभागणी केली आहे. त्याचवेळी त्यात आंतर जिल्हा प्रवासाबाबतचे नियम ठरवून दिले आहे. त्यात ई पास (E-Pass ) ची आवश्यकता केवळ ५ व्या गटासाठी केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, काही जिल्ह्यांनी ४ थ्या गटातील ८ जिल्ह्यातही प्रवास करायचा असेल तर, ई पास ( E-Pass. ) लागेल, असे सांगितल्याने प्रवास करण्यासाठी इच्छुक असणार्यांमध्ये विशेषत: स्वत:च्या वाहनांनी जाणार्यांमध्ये संभ्रम अन गोंधळ निर्माण झाला आहे.
याबाबत आज पुन्हा खात्री करुन निर्णय घेणार असल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
त्याचबरोबर पुण्यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये सायंकाळी ५ वाजल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.
तसेच प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येऊन विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या संचारबंदीमुळेही बाहेरगावाहून येणार्या वाहनांना शहरात येण्यास,
सायंकाळी ५ वाजून गेले तर त्यांची अडवून होणार का ?
अशी शंका प्रवाशांच्या मनात कायम आहेत.
राज्य शासनाने तयार केलेल्या नियमावलीत पाचव्या गटातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास बंधनकारक केला असून,
त्यात अत्यावश्यक कारणासाठीच ई पास दिला जाणार आहे.
मात्र, सध्या तरी कोणताच जिल्हा ५ व्या गटात नाही.
पुणे शहर पोलिसांनी मात्र गट ४ मधील शहरात जाण्यासाठी ई पास लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या गटातील सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, बुलडाणा, सोलापूर, सिंधुदुर्ग या ८ जिल्ह्यांसाठी ई पास लागणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना विचारले असता.
त्यांनी आज खात्री करुन त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
–
याचवेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी खासगी वाहने आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवास करणारे प्रवासी पाचव्या गटात समावेश असलेल्या जिल्ह्यात जाणार असल्यास ई पास बंधनकारक आहे, असे सांगितले.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड हे तिसर्या गटात आहेत तर पुणे जिल्हा हा चौथ्या गटात आहे.
त्यामुळे शहर व जिल्ह्यातील बंधनामध्ये फरक आहे.
एसटी तसेच खासगी ट्रॅव्हलमार्फत प्रवास करणार्यांना ई पासची आवश्यकता नाही.
मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; वांद्रे परिसरातील घटनेत एकाचा मृत्यु, चौघे जखमी